मुख्य घटक वगळा
मेन्यू उघडण्यासाठी क्लिक करा
बंद मेन्यूवर क्लिक करा
मुख्य आशयाला सुरुवात

पाण्याच्या शाश्वततेत योगदानासाठी एफएमसी कॉर्पोरेशनची ख्याती आहे

एफएमसी कॉर्पोरेशन, अग्रगण्य कृषी विज्ञान कंपनी, यांना भारतातील पाणी व्यवस्थापनासंबंधी अनुकरणीय योगदानाबद्दल मान्यता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. teri-IWA-UNDP पाणी शाश्वतता पुरस्कार 2021-22 उद्घाटनाप्रसंगी विश्व पाणी दिवस 2022 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. पुरस्कार कार्यक्रम ऊर्जा संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय जल संघटना आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे संयुक्तपणे आयोजित केला गेला होता.

एफएमसीने आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्प समर्थ अंतर्गत मोहीम हाती घेतली आहे. ज्याद्वारे भारतात 2024 पर्यंत 200,000 शेतकरी कुटुंबांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्प समर्थ उत्तर प्रदेश, पंजाब, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये 57 सार्वजनिक जल शुद्धीकरण संयंत्राद्वारे कार्यप्रणाली केली जाते. ज्यामुळे जवळपास 100,000 शेतकरी कुटुंबांना फायदा होतो. 2022 मध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात सह अन्य राज्यांना समावेश करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

"शाश्वततेच्या आमच्या प्रयत्नांसाठी मान्यताप्राप्त होणे हा सन्मान आहे, एफएमसी इंडियाचे अध्यक्ष श्री. रवि अन्नावारापू म्हणाले, "आमचे ध्येय शेतकरी समुदायाला सक्षम बनवणे आणि प्रकल्प समर्थ सारख्या विविध उपक्रम आणि समुदाय पोहोच कार्यक्रमांद्वारे जीवनमान उभारणे आहे. 4,000 पेक्षा जास्त एफएमसी तांत्रिक क्षेत्र तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत चांगल्या कृषी पद्धतींचा आणि पाण्याचा वापर अनुकूल करताना उत्पादकता वाढविण्यासाठी पाण्याचा शाश्वत वापर करतात. आम्ही पाण्याच्या वापरातील सर्वोत्तम पद्धतींविषयी समुदायाला शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही टेरी-आयडब्ल्यूए-यूएनडीपी द्वारे मान्यताप्राप्त आहोत. हे आम्हाला पाणी व्यवस्थापनाच्या आमच्या मिशनवर पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.”

जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याव्यतिरिक्त, एफएमसी तांत्रिक तज्ञ आणि चॅनेलच्या विस्तृत नेटवर्कद्वारे शेतीमध्ये पाण्याच्या शाश्वत वापरास प्रोत्साहन देते.

प्रमुख पाहुणे श्री भरत लाल, भारताचे सचिव लोकपाल, माजी अतिरिक्त सचिव जल जीवन मिशन आणि श्रीमती शोको नोडा यांच्या उपस्थितीत एफएमसी इंडियाचे सार्वजनिक आणि उद्योग व्यवहार संचालक राजू कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला., भारतातील यूएनडीपी निवासी प्रतिनिधी.

teri-iwa-undp जल शाश्वतता पुरस्काराचा उद्देश 'वॉटर न्यूट्रॅलिटी'चा अवलंब करून विविध भागधारकांमधील पाण्याचं दुर्भिक्ष्य कमी करून un शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे.. हा पुरस्कार पाणी क्षेत्रातील अनेक श्रेणी आणि कार्यपद्धतीत विस्तारलेला आहे आणि त्याचे उद्दीष्ट व्यक्ती, नागरी समाज संस्था, उद्योग, महानगरपालिका मंडळे, गाव पंचायत आणि आरडब्ल्यूए सारख्या विविध भागधारकांना मान्यता आणि प्रोत्साहित करणे आहे. ज्याद्वारे सर्वात परिवर्तनीय, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण मार्गाने स्थानिक पातळीवर गती मिळत आहे.